प्रतिनिधी : प्रतीक वाघे
तुळजापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तुळजापूर तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमन सौ. अनिता श्रीकांत वाघे यांनी तालुक्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी म्हटले आहे की, डॉ. आंबेडकर यांनी भारतीय समाजाला समानता, न्याय आणि बंधुता यांचे महान तत्त्वज्ञान दिले. त्यांच्या विचारांमुळे समाजातील वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग मिळाला. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण करून ते आचरणात आणणे हीच खरी आदरांजली ठरेल.
तसेच, त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून समाज प्रगत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत.
